Image
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
022-22153351
बाब

%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87%20%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र

पात्रता निकष

  • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प, अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु.जाती/ जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
  • निवडलेल्या आकारमानाच्या शेततळ्यासाठी तांत्रिक निकषानुसार योग्य जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  • मार्गदर्शक सुचनेमधील आराखड्याप्रमाणे (DESIGN) व तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य वापरून प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक राहील.
  • इतर कोणत्याही शासकीय योजनेतून अथवा शेतकऱ्याने आकारमानानुसार स्वत: इनलेट आउटलेट विरहित शेततळे केले असल्यास अस्तरीकरण या घटकासाठी शेतकरी पात्र राहील.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे अस्तरीकरणास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसान भरपाई अनुज्ञेय राहणार नाही.
  • मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार शेततळ्याचा प्रकार, आकारमानानुसार व निश्चित केलेल्या तांत्रिक निकषानुसार अस्तरीकरणाचा खर्च अनुदानासाठी ग्राह्य धरला जाईल.
  • या घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुन्हा लाभ मिळणार नाही.

टीप

  • NA

बाब सूची