Image
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
022-22153351
बाब

%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • भूमिहीन कुटुंबातील व्यक्तीसाठी तलाठी/तहसिलदार यांचेकडील प्रमाणपत्र
  • विधवा, परितक्त्या महिला व घटस्फोटीत महिलांकरिता ग्रामसेवक यांचे अभिप्राय
  • विधवा, परितक्त्या महिला व घटस्फोटीत महिला यांचे स्वयंघोषणा पत्र
  • खरेदी समितीचे प्रमाणपत्र

पात्रता निकष

  • या घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुन्हा लाभ मिळणार नाही.
  • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावातील ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती, विधवा, परितक्त्या महिला, घटस्फोटीत महिला, अनुसूचित जाती/जमाती मधील महिला शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
  • पक्षी खरेदीनंतर वाहतुकीचा खर्च लाभार्थीने स्वत: करावयाचा आहे.
  • प्रकल्प कालावधीत या घटकाचा एका लाभार्थीस एकदाच लाभ घेता येईल.
  • एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येईल.
  • मार्गदर्शक सुचनेमधील नमूद पक्षांच्या प्रजाती पैकी पक्षी खरेदी करणे आवश्यक आहे.
  • निवड केलेल्या लाभार्थ्यांना आवश्यकता असल्यास कुक्कुट पालनाचे आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येईल.
  • लाभार्थीने सदरचा व्यवसाय हा किमान ३ वर्षे करणे आवश्यक आहे.
  • पक्षी जोपासण्यासाठी खाद्य व पाण्याची भांडी इ. व्यवस्था लाभार्थ्याने स्वत: करावयाची आहे.
  • मापदंडाव्यतिरिक्त जादाचा खर्च लाभार्थ्याने स्वत: करावयाचा आहे.

टीप

  • NA

बाब सूची