Image
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
022-22153351
बाब

%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A5%87%20%28%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%29

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र

पात्रता निकष

  • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प, अल्प भूधारक शेतकऱ्यांना, अनु.जाती/ जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
  • निवडलेल्या आकारमानाच्या शेततळ्यासाठी तांत्रिक निकषानुसार योग्य जागा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
  • मार्गदर्शक सुचनेमधील आराखड्याप्रमाणे (DESIGN) व तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य वापरून प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक राहील.
  • मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केल्यानुसार शेततळ्याचा प्रकार, आकारमानानुसार व निश्चित केलेल्या तांत्रिक निकषानुसार उभारणीचा खर्च अनुदानासाठी ग्राह्य धरला जाईल.
  • शेततळे पूर्ण करण्याकरिता आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी संबधित लाभार्थ्याची राहील याकरिता कोणतीही आगाऊ (अग्रीम) रक्कम मिळणार नाही.
  • नैसर्गिक आपत्तीमुळे शेततळ्यास कोणत्याही प्रकारची हानी पोहोचल्यास नुकसान भरपाई अनुज्ञेय राहणार नाही.
  • शेतकऱ्याकडे स्वत: च्या नावावर कमीत कमी ०.६० हेक्टर क्षेत्र असावे.
  • या घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुन्हा लाभ मिळणार नाही.

टीप

  • NA

बाब सूची