Image
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प
022-22153351
बाब

गोडया पाण्यातील मत्स्यपालन

आवश्यक कागदपत्रे

  • अर्जदाराचा ७/१२ व ८ अ उतारा
  • अर्जदार अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असल्यास त्याबाबतचा पुरावा
  • अर्जदार दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र

पात्रता निकष

  • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांबरोबरच २ ते ५ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांना, अनु.जाती/ जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येईल.
  • ज्या शेतकऱ्यांकडे संरक्षित सिंचनाची सोय, सामुदायिक शेततळे किंवा वैयक्तिक शेततळे आहे, अशा शेतकऱ्यांना लाभ देय राहील.
  • मत्स्यशेती अंतर्गत घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय नाही.
  • पाण्याचा साठा बारमाही (किमान आठ ते दहा महिने) असणे आवश्यक आहे.
  • मत्स्यपालन करण्यासाठी तलाव हे शक्यतो आयताकृती असावेत, ज्यामुळे मासे पकडण्यासाठी जाळे फिरवणे सोयीचे जाईल.
  • तलावाची खोली किमान १.२ मी. ते २ मी. असणे आवश्यक आहे.
  • विहित तांत्रिक निकषाप्रमाणे कामे केल्यानंतर मार्गदर्शक सुचनानुसार वित्तीय मर्यादेत अनुदान देय राहील.
  • या घटकाकरिता इतर कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत पुन्हा लाभ मिळणार नाही.

टीप

  • NA

बाब सूची